पुणे पोलिसांचा शेतकऱ्यांवर गोळीबार

पुणे-पवनानदी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेले मोरेश्वर साठे हे यांना अटक केल्यावर ते गोळीबारात मृत्यूमुखी कसे पडले, गोळीबाराला कोणी अज्ञान मोटारवाल्याने सुरुवात केली तर मग त्या बाबत पोलीसांनी जबाबासाठी पुढे आणलेली व्यक्ती मूळच्या जबाबात ‘तसे मी कांही पाहिले नाही’ असे कबूल करून बसली आहे, अशा अनेक विरोधाभासाचा सामना करण्यात आज पुणे जिल्हा पोलीसांचा दिवस गेला. माहिती  तंत्रज्ञानाची प्रगती ही आज पुणे जिल्हा पोलीसांची सर्वात मोठी अडचण बनली. कारण जेंव्हा पोलीस आंदोलकावर गोळीबारासाठी बंदुकीचा नेम धरून बसले होते तेंव्हा बहुतेक वाहिन्याचे कॅमेरामन उंच टेकाडावर सर्व बाबी कॅमेर्‍यानें टिपत होते. आज तरी पवनानदीच्या पाणयासाठी आंदोलन करणार्‍यावर गोळीबाराचे समर्थन करण्याचा प्रत्येक प्रयत्न वाहिन्यांनी दाखवलेल्या कव्हरेजमधूनच परस्पर टोलवला जात होता.
याबाबत शिवसेनानेते उद्धव ठाकरे यानी मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले पाण्यासाठी आंदोलन करणाया शेतकयांवर गोळीबार करणारे सरकार जनतेचे रक्षक आहे की नरभक्षक आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पवनेच्या पाण्यावरून मावळात झालेल्या रक्तरंजित आंदोलनानंतर ठाकरे यांनी तळेगाव आणि परिसरात भेट देऊन गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांचे कुटुंबिय आनि नातेवाईक यांची भेट घेतली. तसेच शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांची विचारपूस केली.त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासह पक्ष प्रवक्त्या डॉ. नीलम गोहे खासदार गजानन बाबर र्संफप्रमुख मच्छिंद्र खराडे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले,  राज्यात कोणाचीही टगेगिरी चालू देणार नाही. पोलिसांवर सरकारचा वचक नसल्यानेच राज्यात कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडल्याचा आरोप करून ते म्हणाले की कायदा सुव्यवस्था राखू न शकणाया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी राजीनामा द्यावा.
बऊर येथे आंदोलन करणाया मोरेश्वर साठे यांचा पोलिसांनी खून केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. गोळीबार सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी साठे यांना ताब्यात घेतले होते. मग ठाकरे गोळीबारात मृत्युमुखी कसे पडले असा सवाल त्यांनी केला.पवनेच्या पाण्याचा प्रश्न एकत्र बसून सुटू शकतो. मात्र वेळ आल्यास या प्रश्नासाठी शिवसेना न्यायालयीन लढाई लढेल असेही त्यांनी सांगितले.
पोलीसअधीक्षक कर्णिक यांची पत्रकार परिषद

पवनेच्या पाण्याचे आंदोलन हे अज्ञात व्यक्तीच्या गोळीबारांने हिसक झाले असे असे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केले.  मावळातील पवनेच्या पाण्याचे आंदोलन चिघळविण्याचा काही समाजद्रोही घटकांचा प्रयत्न होता हे सिद्ध झाले असून पोलिसांनी गोळीबार केला असला तरीही कोणाचा ठरवून ’एन्काऊंटर’ केलेला नाही , असेही त्यांनी बोलून दाखविले.
      मावळातील आंदोलनात झालेला हिसाचार आणि टीकेचे लक्ष्य झालेला पोलिसी गोळीबार या पार्श्वभूमीवर कर्णिक यांनी पोलिसांची बाजू पत्रकारांसमोर स्पष्ट केली.
     मोरेश्वर साठे यांच्या मृत्यूबाबत शिवसेना कार्याथ्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत स्पष्टीकरण देताना कर्णिक म्हणाले की साठे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलकांपासून दूर नेत असताना पोलिसांना हुलकावणी देऊन ते सटकले आणि पुन्हा आंदोलकांमधे जाऊन मिसळले. तोपर्यंत जाळपोळ आणि दगडफेक सुरू झाल्याने त्यांना पुन्हा ताब्यात घेता आले नाही आणि ते गोळीबारात बळी पडले.
     आंदोलक हिसक झाल्यावर ६ पोलीस अधिकायांनी एकूण ५१ गोळया झाडल्या असून सुरूवातीला ३४ रबरी गोळयाही झाडण्यात आल्या. गोळीबाराने १० जण जखमी झाले असून त्यापैकी ६ जणांना कंबरेखाली गोळया लागल्या आहेत अशी माहिती कर्णि यांनी दिली.
     नवनाथ पांगारे हे जखमी आंदोलक पोलिसांच्या नव्हे तर अन्य एका इसमाने खाजगी रिव्हॉल्वरमधून झाडलेल्या गोळीने जखमी झाले असून तसे त्यांनी आपल्या जबाबात नमूद केल्याचे कर्णिक यांनी स्पष्ट केले. पांगारे यांच्यावर गोळीबार झालेले ठिकाण हे आंदोलनाच्या ठिकाणापासून एक किलो मीटर अंतरावर असून कारमधून जाणाया व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. याबाबत वडगाव मावळ पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.ंेलीस उपनिरिक्षक आणि त्यावरील हुद्दयाच्या अधिकायांना घटनास्थळी परिस्थिती पाहून गोळीबाराचा निर्णय घेण्याचा अधिकार असून त्यानुसार आम्ही गोळीबार केला. हा निर्णय संयुक्तिक होता की नाही हे पुढील चौकशीतून स्पष्ट होईल असेही कर्णिक म्हणाले.
श्री पांगारे यांनी मात्र काल वाहिन्यांशी बोलताना हल्लेखोर आपणाला दिसणे शक्य नव्हते असे सांगितले होते.
 चौकट
 सहा पोलीस निलंबित  
 आंदोलनादरम्यान काही पोलीस कर्मचायांनी वाहनाची मोडतोड आणि दगडफेकीसारखे गैरप्रकार केले असल्याचे चित्रिकरण आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब यावरून स्पष्ट झाले असून अशा कर्मचायांवर कारवाई केली जाईल असे कर्णिक यांनी दुपारी पत्रकारांशी बोलताना सांगितले आणि संध्याकाळी ६ पोलीस कर्मचायांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यापुढेही संशयित कर्मचायांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.        

Leave a Comment