महाराष्ट्रात बदल अटळ – राज ठाकरे

अहमदाबाद- गुजराथच्या दौर्‍यावर असलेले आणि गुजराथ विकासाचे रहस्य समजून घेत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या कामाचा अजेंडा आताच नक्की केला असून महाराष्ट्रात बदल अटळ असल्याचे विधान केले आहे.
   राज ठाकरे म्हणाले की गुजराथचे विकास मॉडेल अभ्यासताना असे आढळते आहे की गुजराथच्या विकासात समाजातील सर्व थरांचा सहभाग आहे. समाजाच्या पाठिब्याशिवाय एकटे नरेंद्र मोदी काय करू शकणार होते? अर्थात मोदींनीही हा पाठिबा त्यांच्या कामामुळे तसेच सर्व थरातील लोकांना विश्वासात घेऊन विकासात सहभागी क रून घेतल्यामुळेच मिळाला आहे. महाराष्ट्रातही गुजराथेप्रमाणे राजकीय बदल होणे अटळ आहे.अर्थात हे काम अशक्य नाही. आज महाराष्ट्राच्या जनतेचा राजकीय नेत्यांवर विश्वास उरलेला नाही. सध्या येथील जनता कोणावर विश्वास ठेवायचा अशा भ्रमात सापडली आहे मात्र आपण ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment