मुंबई – आगामी गणेशोत्सव काळात मुंबईत नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटांची दखल घेऊन सर्व गणेश मंडळांनी आपापल्या मंडपात सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे असे समजते. मात्र सीसीटिव्ही कॅमेर्यांसाठी मोठा खर्च येत असल्याने सर्वच मंडळे हे कॅमेरे बसवू शकत नाहीत असा पवित्रा गणेश मंडळांनी घेतला आहे. ज्या मंडळाकडे मोठा निधी आहे, ते कॅमेर्यांचा खर्च करू शकतात मात्र जी मंडळे छोटी आहेत ती हा खर्च पेलू शकणार नाहीत असे सांगण्यात आले असून मुख्यमंत्री निधीतून अथवा आमदार निधीतून या मंडळांना कॅमेरे पुरविले गेले तर ते शक्य होणार असल्याने सरकारने या बाबत विचार करावा अशी मागणी गणेश मंडळ प्रतिनिधींतर्फे करण्यात आली आहे.