सर्व राजकारणी एकाच माळेचे मणी – अण्णा हजारे

मुंबई-लोकपाल विधेयकासंदर्भात आपण महाराष्ट्रतील कोणत्याही नेत्याची भेट घेतली नसून सर्व राजकारणी हे एका माळेचे मणी असतात, असे विधान अण्णा हजारे यांनी शनिवारी मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना केले.देशात लोकपाल विधेयकाची चर्चा जोरात सुरू असून अण्णा व सरकारच्या मसूदा समितीती मोठे मतभेद आहेत. या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना व इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना भेटलो नसल्याची कबूली अण्णांनी दिली. लोकपाल विधेयक मंजूर होण्यासाठी सर्व जनतेन एकत्र येऊन लढा दिला पाहीजे. येत्या १५ ऑगस्ट रोजी सर्वांनी रात्री ८ ते ९ दरम्यान आपल्या घरातील दिवे बंद करुन सरकारच्या हलगर्जीपणाचा निषेध करावा असेही अण्णा म्हणाले.टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यासंदर्भात कपिल सिब्बल व इतर नेत्यांची चौकशी करावी व ते दोषी आढळल्यास पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही यावेळी अण्णांनी केली.           

Leave a Comment