औरंगाबाद : सोन्याच्या दागिन्यांची लूट

औरंगाबाद १७ मार्च – औरंगाबाद शहरातील तोतया पोलिसांचा धुमाकूळ अजूनही चालूच आहे.एका महिलेला आम्ही पोलिस आहोत आणि समोर खून झाला आहे अशी थाप मारून तिचे दागिने पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने लांबविल्याची घटना घडल्यानंतर पुन्हा तसाच प्रकार किराणा चावडी भागात उघडकीस आला आहे.पोलिस असल्याची थाप मारत तीच पद्धत वापरून ८० हजारांची सोन्याची पोत चोरट्यांनी पळविली.देवदर्शन करून किराणा चावडी भागात निर्मलादेवी उत्तमचंद लहाडिया या सत्तर वर्षाच्या वृद्ध महिला चालत जात होत्या,त्यांना चोरट्यांनी गंडा घातला.सिटी चौक पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Comment