मुंबई : ऊर्जा संवर्धनाचा अनोखा उपक्रम

मुंबई १६ मार्च – विजेचा अपव्यय टाळणे जाणे ही काळाची गरज असल्याचे ओळखून टाटा पॅावर या देशातील सर्वात मोठ्या वीज कंपनीने शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने टाटा पॉवर एनर्जी क्लब हा उर्जा संवर्धनाचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

आतापर्यंत या नाविण्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून देशभरातील दोन कोटींहून जास्त नागरिकांपर्यंत ऊर्जा संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यात टाटा पॉवर एनर्जी क्लबला यश मिळाले आहे. यामुळे तब्बल २.८ दशलक्ष युनिट विजेची बचत झाली. २०१०-११ या वर्षांत टाटा पॉवर एनर्जी क्लबने २८५ शाळांमधील २.५ लाख मुलांना वीज बचतीसंदर्भात माहिती करुन दिली.

Leave a Comment