बुलडाणा : वीरचंद नरसी जिनींगला आग, ३०० गठाणी खाक

बुलडाणा ८  मार्च – प्रख्यात कॉटनकिग मे.वीरचंद नरसी कॉटन यांच्या मलकापूर येथील जिनींग मिलला लागलेल्या आगीत २५० ते ३०० रुई गठाणी जळून जवळपास ८५ ते ९० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.मे.वीरचंद नरसी यांचे अग्निशामक दल, कृषी उत्पन्न बाजारा समितीचे अग्निशामक दल यांच्या सहकार्याने ४ ते ५ तासात ही आग आटोक्यात आणण्यात आली.

मे. वीरचंद नरसी कॉटन प्रा. लि. मध्ये अद्ययावत युनिटच्या बाजुला असलेल्या गोडावूनमधून धूर निघत असल्याचे पाहून काही जणांनी धाव घेतली असता त्यांना आग लागल्याचे दिसून आले. ही आग आटोक्यात आणण्याचा तात्काळ प्रयत्न करण्यात आला. दरम्यान आगी विझविण्यासाठी पोलिस यंत्रणा, खामगाव, बुलडाणा आदी ठिकाणांवरील अग्निशामक दलालाही बोलावण्यात आले. घटनेची माहिती पसरताच शहरातील नागरिक, व्यापारी यांनी जिनींगकडे धाव घेतली. मात्र आगीत गोडावूनमध्ये असलेल्या ५०० रुई गठाणांपैकी २५० ते ३०० गठाणी जळून खाक होऊन ८५ ते ९० लाख रुपयांचे नुकसान झाले. सर्वत्र कापूस पसरलेला असल्याने ही आग लवकर आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment