मुंबई: पिवळ्या पाण्यामागे कोणतेही षडयंत्र नाही – अतिरिक्त आयक्त गुप्ता

मुंबईकरांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात क्लोरिनची मात्रा वाढल्याने त्याचा रंग पिवळा झाला आहे.यामागे कोणत्याही प्रकारचे षडयंत्र नाही, असे स्पष्टीकरण पालिकेचे अतिरिक्त आयक्त गुप्ता असीन गुप्ता यांनी बुधवारी स्थायी समितीसमोर दिले.गेल्या काही दिवसांपासून मुंबईत येणाऱ्या पिवळ्या पाण्यामागे माफियाचे षडयंत्र असल्याचा आणि पालिकेचे अधिकारी त्यात सहभागी असल्याचा आरोप पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केला होता.या आरोपाबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सदस्यांनी केली होती.पिवळ्या पाण्याचे नमुने आयआयटी,युआयसीटी,व्हीजेटीआय अशा प्रयोगशाळा मध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले असून या संबंधीचे सविस्तर अहवाल पालिकेला प्राप्त होतील.मात्र आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासणीतून पाणी पिण्यास पूर्णपणे योग्य आहे, असे गुप्ता यांनी पुन्हा एकदा ठासून सांगितले.

Leave a Comment