
प्लास्टिकच्या विघटनास शकडो वर्षे लागत असल्याने सगळ्या सजीवसृष्टीला त्यापासुन धोका निर्माण झाला आहे. चरणाऱ्या गाईगुरांच्या पोटात गेल्यास त्यांना विषबाधेचे प्रकारही होतात. प्लास्टिकच्या या राक्षसापासुन समुद्री जीवांचीही सुटका झालेली नाही. शिवाय प्लास्टिकचा पुनर्वापर हि अत्यंत खर्चिक प्रक्रिया असुन त्याचे घटक वेगळे करण्यास ऊर्जाही खुप लागते. अशा प्लास्टिकचे विघटन व्हावे यासाठी अनेक शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. असाच एक प्रयत्न केला आहे अरगॉन नैशनल लेबोरेटरीतील शास्त्रज्ञ विलास पोळ यांनी. त्यांनी टाकाऊ प्लास्टिकचे मिश्रण अणुभट्टीत ७०० अंश से. पर्यंत तापविले. या तपमानाला अणुभट्टीतील दाब खुपच वाढतो व त्यामुळे प्लास्टीक रेणुतील हायड्रोजन व कार्बन यांच्यातील बंध कमकुवत होऊन हायड्रोजन व कार्बन सुटे होतात.
