फेसबुकमुळे भारतीय तरुण झाला इराणचा जावई

marriage
रांची – झारखंडमध्ये नुकतीच एक अशी घटना समोर आली आहे की, फेसबुकमुळे थेट भारत आणि इराणमध्ये प्रेमाचे संबंध जुळून आले आहेत. बँकेत नोकरी करणाऱ्या एका भारतीय तरुणाचे फेसबुकच्या माध्यमातून इराणध्ये राहणाऱ्या मुलीशी सूत जुळले आहेत.

याची सविस्तर माहिती अशी की, रांची येथे राहणारा आणि पेशाने बँक व्यवस्थापक असणाऱ्या तुषारची फेसबुकच्या माध्यमातून इराणच्या शब्बानी बरोबर ओळख झाली. शब्बानी पी.एचडी. करत आहे. दोघांनी साताजन्माच्या आणाभाका घेऊन एकमेकांशी लग्नगाठ बांधली आहे.

दोघांची पाच वर्षापूर्वी फेसबुकवर ओळख झाली होती. तेव्हापासून दोघे संपर्कात होते. नुकताच त्यांनी कोर्टात नोंदणी पद्धतीने विवाह केला. विशेष म्हणजे, झारखंडचे मंत्री शरयू रॉय हे सुद्धा सर्व कार्यक्रम बाजूला ठेऊन आपल्या सर्व कुटुंबासह नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद द्यायला हजर होते.

Leave a Comment