नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या बळीराजाला मोठा दिलासा दिला असून शेतकऱ्यांना सध्या मिळणाऱ्या भरपाईपेक्षा दीडपट जास्त नुकसान भरपाई मिळणार आहे.
याशिवाय ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले शेतकरी भरपाईसाठी पात्र असतील, पूर्वी ही मर्यादा ५० टक्के होती. राजधानी दिल्लीमध्ये मुद्रा बँकेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे यापुढे पूर्वी मिळणाऱ्या मदतीपेक्षा दीडपट जास्त मदत शेतकऱ्यांना मिळेल. परिमाणी दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.